Milk Price

Milk Price । ऐन सणासुदीत पशुपालकांचं गणित बिघडलं! दुधाच्या किमती कमी आणि चारा महागला

पशुसंवर्धन

Milk Price । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk Rate) कमालीचे कमी झाले आहेत. पशूंचा चारादेखील खूप महाग झाला आहे. एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. जर हे दर असेच घसरत चालले तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापू शकते. सणासुदीच्या काळात देखील दर कमी (Milk Rate Falls Again) झाल्याने पशुपालक वर्ग अडचणीत आला आहे. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत.

Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार

पाच-सहा महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाचे दर ३८ रुपये इतके होते. परंतु ते आता थेट २७ रुपयांपर्यंत खाली आले आहे. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी २६ रुपये दर पाहायला मिळत आहे. यंदा देशातील अनेक राज्यात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर खूप वाढले आहेत. पशुपालकांना चारा जास्त किमतीने विकत घ्यावा लागत आहे. दुधाच्या किमती कमी आणि चारा महाग झाल्याने पशुपालकांचं गणित बिघडलं आहे.

Baramati Doodh Sangh । बारामती दूध संघाने दिलेल्या बोनसमुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

सरकारने नेमली समिती

काही दिवसांपूर्वी सरकारकडून गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने अभ्यास करून गाईच्या दुधाला कमीत कमी ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले होते. यानुसार दूध संघांनी देखील २१ जुलैपासून ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएपला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली होती. परंतु रिटर्नचे दर वाढवून एसएनएफच्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरु केली.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

पशुखाद्याचे दर

५० किलो पेंडेचा दर १ हजार ७०० रुपये इतका आहे. तीन महिन्यांपूर्वी हेच दर १ हजार ५०० रुपये इतके होते. सुग्रास कांडी १ हजार ६०० रुपयांवरून १ हजार ७५० झाली आहे. ऊस आणि चारा कुट्टीचे दर वाढले आहेत.

KVP Scheme । शेतकऱ्यांसाठी खास योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या

पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष

पशुपालक कमालीचे नाराज झाले आहेत. हे दर पूर्वीप्रमाणे कमी करण्यात आले आहेत. पशुसंवर्धनमंत्र्यासह सगळेच नेते याकडे लक्ष देत नाही. एकंदरीतच सरकारने नेमलेल्या समितीसह पशुसंवर्धन विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. पशुपालनाचा व्यवसाय पुन्हा एकदा धोक्यात आला असून आता याकडे सरकार कितपत लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *