Havaman Andaj

Havaman Andaj । 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत असे असणार महाराष्ट्राचे हवामान, पंजाबराव डख यांनी वर्तवला नवीन अंदाज

हवामान

Havaman Andaj । निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान (Heavy Rain) घातले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे (Heavy Rain Update) शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तापमानात देखील घट झाली आहे.

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी महाराष्ट्राच्या हवामानबद्दल नवीन अंदाज वर्तवला आहे. राज्याचे 25 नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील. शिवाय कोरड्या हवामानामुळे तापमानात देखील कमी झाल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे राज्याला थंडीची लाट अनुभवायला मिळेल. इथून पुढे राज्यात पाऊस (Rain Update) पडणार नाही. गहू आणि हरभरा या पिकांसाठी हे हवामान चांगले असेल.

Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या दिसणार जमिनीचा नकाशा आणि सातबारा उताऱ्यासह रेडीरेकनरचे दर

राज्यात 15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. या हवामानामुळे गहू आणि हरभरा या पिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

Fruit crop insurance । बागायतदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यावर जमा झाली फळपीक विमा परताव्याची रक्कम

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी सर्वांना सहन करावा लागतो. यंदा राज्यात उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यात त्याने काही ठिकाणी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. अशातच ऑक्टोबर महिन्यात देखील पाठ फिरवली. पावसाच्या या लपंडावामुळे नदी, नाले आणि धरणांनी तळ गाठला आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर संकट आले आहे.

Onion Subsidy । कांदा चाळ उभारण्यासाठी सरकार देतंय 75% अनुदान, असा घ्या लाभ

राज्यावर पाणीसंकट

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने पिके धोक्यात आली आहे. पशुपालकांना चारा जास्त किमतीने खरेदी करावा लागत आहे. अगोदरच दुधाचे कमी झालेले दर त्यात वाढलेल्या चाऱ्याच्या किमतींमुळे दूध व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना चारा कोठून उपलब्ध करायचा असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

Combine Harvester । पिकांच्या कापणी आणि मळणीसाठी हे मशीन आहे लै भारी! जाणून घ्या किंमत आणि खासियत

या कारणामुळे पडत होता अवकाळी पाऊस

राज्याला थंडीची चाहूल लागली असतानाच राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढत चालला आहे. या पावसामुळे काही भागातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *